Thursday, April 18, 2013

जलदुर्ग कुलाबा


जलदुर्ग कुलाबा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे.

 





अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे.


 



          भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्याला कुलाबा हे नाव पडले.तेथून भरती असेल तर लाँच सर्व्हिस वापरायची,ओहटीला घोडागाडी किंवा चालत जलदुर्गाला लागायचे.








  मुबंईहून मुंबईच्या प्रवेशव्दारच्या बाजुला असलेल्या बोट सेवेच्या बोटीतून प्रवास करीत मांडवा येथे उतरायचे.प्रवास सुखद वाटतो.मांडवा येथे उतरल्यावर तेथून बसने अलिबग गाठायचे.मुबंई ते अलिबाग असे बोटीचे व बसचे भाडे एकत्र आकारले जाते.अलिबाग येथे चहापान करुन बीचला पोहचायचे.









      प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे.


































अलिबागपासून तीन किमी. वर एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. निजामशाहीच्या काळात सद्दी लोकांनी कुलाबा व रत्नागिरी या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली आणि तेथे काही जलदुर्ग व भुईकोट किल्ले बांधले.










अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.










 किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत.












 पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.








 किल्ल्यावर सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो.




 मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे.



 
                                                                         दुर्गावरचे  झेंडावदनाचे ठिकाण









                                                                      मुख्य प्रवेशद्वार










किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत.

No comments:

Post a Comment