Monday, September 25, 2017

आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी


                           २५.०९.२०१७ रोजी ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 



                                                  इथे क्लिक करावे  ===>>    ठाणाळे लेणी




                                                        आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी 



ह्याद्रीच्या कुशीतली भ्रमंती आपल्याला अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय करून देते. रानाची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि तिथले फळं-फुलं-वन्यजीव असे एक वेगळंच जीवन अनुभवायला मिळते. अशीच आडवाटेवरची डोंगरयात्रा करायचे ठरले.वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत.तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे.काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचेया घाटमार्गावर पावसाळी धबधब्यांचे सौंदर्य मनमुराद पाहायला मिळते.ऐन पावसाळ्यात येथील भटकंतीला रंगत येते ती इथे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे. 












 अष्टविनायकातील सुप्रसिद्ध गणपती पालीच्या जवळ ऐन सह्यद्रीच्या कुशीत विसावलेले हे ठिकाण.ठाणाळेगावापासून लेणीपर्यंत मात्र पायी जावे लागते.ठाणाळे गाव डोंगराच्या पायथ्याशीच वसलेले आहे.छोटेसे गाव त्यात आम्हाला वाट दाखविण्यासाठी एक वाटाड्या भेटला. गावाच्या मागच्या बाजूने आम्ही चढायला सुरवात केली. घनदाट जंगल, रिम झिम पाऊस सुरु होता.जंगलातली ही पायवाट खूपच निसरडी होती. सुमारे अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाटेत एक ओहोळ (ओढा) लागला आणि तो ओहोळ पार करून पुढची वाट धरावी लागेत.दोन दिवसाच्या पावसाने ओढ्याला पाणी वाढले होते.मोकळ्या माळरानावर आल्यावर   लांबून लेणींचे दर्शन झाले.चागंलेच जंगल असल्याने परिसर हिरवेगार झालेले होते.वाटाड्या मागदर्शनाखाली चढत उतरत एकमेकांना मदतीचा हात देत लेण्यांच्या दिशेने वाटचाल सुरु होती.पुढे आल्यावर लेणी दिसत नव्हत्या.रानात चकव्या वाट पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.रमतगमत एक ते दिड तास लेण्यात पोहचण्यास लागतो.पण परिसर खुपच छान आहे.









पायथ्यापासून १००० फुटांवर असलेली ही लेणी पश्चिमाभिमुख आहेत.ठाणाळे लेणी ही २३ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. लेणीतील चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. दक्षिणोत्तर दिशेत एका माळेत कोरलेल्या बहुतांशी लेण्यांमध्ये बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी दगडी ओटे खोदलेले आहेत.कालावैभावाने नटलेल्या सभागृहाच्या छतावरही अज्ञात शिल्पकारांनी कौशल्याने अलंकरण केले आहे.छतात कोरलेले,झुम्बाराचा आभास निर्माण करणार हे शिल्प कातळकलेचा सर्वोत्तम आविष्कार आहे.उत्तरेकडील लेणी फारशी आकर्षक नसून अर्धवट राहिलेली आहेत. 



काही लेण्यांची काळाच्या ओघात पडझड झाली आहे.अलिकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.या लेण्या स्वच्छ होत्या.या लेण्या आडरस्त्याला असल्याने पर्य़टकांची गर्दी नसल्याने लेण्या पाहून मन प्रसन्न झाले.या ठिकाणाहून जाऊच असे वाटत होते.   








लेण्यांना भेट दिल्यानंतर जेवलो व एका धबधब्याखाली मनसोक्त मजा केली. बहुतेक सर्वच लेणी अपूर्ण अवस्थेत आहेत. पण हि जागा खूपच सुंदर आहे.पुढल्या वेळीस लेण्यांमध्ये रहाण्याच्या तयारीनेच येऊ असे म्हणत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

No comments:

Post a Comment