सन १६६३ मध्ये शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा असे दोन किल्ले मिळवले.त्यांनी त्यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांना परळीच्या किल्ल्यावर रहाण्याची विनंती केली होती.कालांतराने त्या किल्ल्याचे नामकरण सज्ज्नगड असे झाले.
गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार अग्नेय दिशेस आहे.
दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात.
२ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगड. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्ज्नगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
३३५० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
समोरच किल्ल्याचा तट आहे येथून सभोवतालचा परिसर पारच सुंदर दिसतो.
धाब्याच्या मारुतीचे मंदिर
गडावरुन दिसणारा रमणीय परिसर
सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
श्रीरामाचे मंदिर
गडावरील इमारतीचे अवशेष
गडावरचे रामदासांचे अनुयायी
पेठेतल्या मारुतीचे मंदिर
गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्ज्नगड (सेवा मंडळाच्या) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.गडावर जेवण्याची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी आहे.
No comments:
Post a Comment